मंगळवार, २९ मार्च, २०११

वेश्यागृहे चालविण्यासाठी मुलींचे व स्त्रियांचे पुरवठ्याचे मार्ग

१. त्यांच्या वेश्या गृहात जन्मास  आलेल्या मुली.
२. रस्त्यावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी भिक मागत फिरणाऱ्या मुलीना  आमिष दाखवून गृहात आणणे.
३. यात्रा, रेल्वे, बस अशा ठिकाणी चुकलेल्या मुलीना पाळणे.
४. यात्रा, प्रवास व रस्त्यावरून मुलीना फूस लावून व जबरदस्तीने पळवून नेणे. 
५. दुसय्राने पळविलेल्या मुली विकत घेणे.
६.   योग्य मुलींवर गुंदेगिरी करून व बलात्कार करून त्यांना समाजातून उठविणे व हळू हळू स्वतःच्या कचाट्यात त्यांना पकडणे.
७. काही कारणाने घरातून पळून जाणाय्रा, सावत्र आई व बाप, दुष्ट नवरा, यांच्या जाचाला कंटाळलेल्या किवा फाजील धाडसी  व मूर्ख मुलीना खोटी प्रलोभने दाखवून इच्छेने व अनिचेने पळविणे. 





शुक्रवार, २५ मार्च, २०११

बालवेश्या आणि वेश्यांच्या अल्पवयीन मुली

अ] बालवेश्या:                                                                                                                                       
           बालवेश्या ह्या १६ वर्षांच्या आतील असतात. ह्या व्यवसायात बाल्वेश्याना प्रचंड मागणी असते कारण जेवढी कोवळी मुलगी तेवढी मजा जास्त अशी भावना वास्नाधीन लोकांची असते. तसेच ह्या मुलींपासून एडस सारखा  महाभयंकर रोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात नसते. ह्या कारणास्तव आज संपर्ण जगात बाल्वेश्यांना प्रचंड मागणी आहे.
ब] वेश्यांच्या अल्पवयीन मुली:  
                ज्या वेळेस वेश्या ह्या मुलीना जन्म देतात त्यावेळेस त्यांना स्वतःला,दलाल, कोठेवले व घरवाले ह्यांना अतिशय आनंद होतो. कारण त्यांना वाटते कि मुलगी मोत्जी झाल्यावर आमदनी मिळेल तसेच म्हातारपणात आधार मिळेल अशा कारणामुळे वेश्यांना मुलगी झाल्यावर आनंद होतो. अनेक वेश्यांवर कर्ज असते व त्या प्रचंड व्याजही भरत असतात. हे  कर्ज फेडण्याची नसते त्यांचीी नसते व तसेच आर्थिक  परिस्थिती हि दुर्बल असल्यामुळे ह्या वेश्या आपली मुलगी मोठी झाल्यावर ह्याच व्यवसायात आणतात. ह्यामुली  वयाने लहान असल्यामुळे त्यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य वा ज्ञान नसल्यामुळे  ते ग्राहकांच्या प्रेमात पडतात अशा मुळे त्या गर्भवती  होतात. काही वेश्या ह्या आपल्या मुलींना ह्या वातावरणापासून दूर ठेवतात व आपल्या रोजगारातून त्यांना पेसे पाठवितात, तसेच त्या मुलींचे लग्नही लावून देतात. 
                    परंतु जेव्हा त्या पतीला सत्य वस्तुस्थितीची माहिती होते तेव्हा तो त्या मुलीला मारतो व त्रास देतो हे वस्तुचित्र दिसून येते. देव्दासिच्या मुली ह्या परंपरेनुसार देवदासी बनतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय हलाखीची असते.  त्यांची परिस्थिती हलाखीची त्या ह्या व्यवसायाकडे वळतात. आई होणे हा स्त्रीच्या जीवनातील सर्वात मोठा आनद असतो म्हणून वेश्या स्त्रियांनाही मुल व्हावे असे वाटते.तसेच म्हातारपणात मुळे आपला सांभाळ करतील म्हणून त्यांना मुल हवे असते.



गुरुवार, २४ मार्च, २०११

वेश्या व्यवसायाचे परिणाम

1. ह्या व्यवसायामुळे स्त्री जातीचा व पर्यायाने संपूर्ण मानव जातीचीच अधोगती होत आहे.
२.  हा व्यवसाय चालविण्यासाठी अब्रू घालवून आज अनेक मुली या नरकात येत आहेत.
३. अनेतिक व अयोग्य  मार्गाने गरजा पूर्ण करता येत असल्याने विवाह संस्थेचे पावित्र्य व उदात्तता  ह्यांनाच धोका उत्पन्न होतो.  
४.बाहेरचा नाद लागल्याने अनेक सुखी कुटुंबे धुळीस मिळाली आहे.
५.समाजाच्या नीती मूल्यांना जबरदस्त हादरा बसला असून समाजात अशा तर्हेने स्वैराचार सुरु झाल्यास मानव जातीला आताच त्याचे भयंकर मोल देण्याची वेळ येऊन ठेपते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
६.  वेश्या व्यवसायामुळेच व वासनाधीन आंबट शोकीनान्मुळेच अश्लील  चित्रपटांची  निर्मिती होत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर विशेषतः तरुण वर्गावर होऊन ते दिशाहीन होत आहे.
७. ह्या व्यवसायामुळे नेतिकतेचा ह्रास होत आहे.
८.  एडस, गुप्त रोग आदि चा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
९. बालवेश्यांच्या  प्रचंड मागणीमुळे मुलीना पळवून नेणे, फसवणे, आमिष दाखवून ह्या व्यवसायात आणण्याचे प्रकार वाढत असल्याने सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे.
 १०.गुप्त रोग, एडस सारख्या रोगाचा फेलाव होऊन अनेक निरापराध व नवीन जन्मास येणार्या बालकांना सुधा ह्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहे. 
              अशा तर्हेने ह्या व्यवसायाचे दुष्परिणाम लक्षात घेवूनही काही लोक या व्यवसायात उपयोगिता आहे असे म्हणतात. त्यांच्या मते, हा व्यवसाय समाजात असल्याने अनेक व्यक्तींची गरज भागवली जाते,तसे झाले नसते तर समाजातील सर्व साधारण स्त्रियांना या लोकांचा उपद्रव झाला असता.या मुद्द्यातील काही भाग एकवेळ मान्य करूनही या व्यवसायासाठी ज्या तर्हेने स्त्रिया मिळविल्या जातात ते मार्ग केव्हाही इष्ट नाही हे नजरेआड  करून चालणार नाही असे वाटते.

बुधवार, २३ मार्च, २०११

भद्रकाली(सफेद लेन) विभागाची माहिती

नाशिक शहर हे अतिप्राचीन  शहर असून हे धार्मिक तीर्थ क्षेत्र व पावन भूमी म्हणून हि समजले जाते. नाशिक शहराचे मध्यवर्ती व विकसित व्यापार केंद्र  म्हणून भद्रकाली हा भाग ओळखला जातो.  भद्रकाली भागाजवळ मेनरोड, शालीमार, रविवार पेठ आदि. विकसित भाग भद्रकालीच्या आजूबाजूला आहे. भद्रकाली हे नाव  भद्रकाली देवीच्या नावामुळे पडले आहे. शहरातील प्रतिष्ठा व गर्दीचे ठिकाण असल्यामुळे  भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये वेश्या व्यवसाय सर्रास सुरु आहेत. नाशिक  शहरातील वेश्या व्यवसायाचा विचार करता हा व्यवसाय विशिष्ट ठिकाणी चालतो. ह्यात भद्रकाली, गंजमाळ, फुले नगर, वूनय नगर तसेच काही हॉटेल्स मध्येहि वेश्या व्यवसाय चालतो असे समजते.  त्याच प्रमाणे रस्त्यावर अथवा गर्दीच्या ठिकाणी चालणाय्रा वेश्या व्यवसायात भद्रकाली, मेनरोड, फुले नगर व मार्केट यार्ड आदि ठिकाणी व्यवसाय सर्रास चालतो.  नाशिक शहरामध्ये वेश्या व्यवसाय करणारे प्रमुख ठिकाण म्हणून भद्रकाली येथे चालणारा व्यवसाय होय.
        भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये हा व्यवसाय चालतो. हा भाग अतिशय गलिच्छ असून आरोग्य विषयक सोई -सुविधा हि अपुर्या आहेत, येथील वेश्यांची संख्या ६० ते ८० च्या वर असून ह्या व्यतिरिक्त अनेक स्त्रिया ह्या दररोज येऊन जाऊन करतात असे वस्तुचित्र आहे.  भद्रकाली येथे अनेक वेश्या ह्या २० वर्षांच्या आतील आहे तर काही बाल वेश्याही आहेत.ह्यास शांताबाईचा अड्डा असेही म्हणतात.भद्रकाली भागात दलाली पद्धतही आहे तसेच अनुभवी वेश्या ह्या व्यवस्थापनेचे कार्य  करतात.  एकंदर भद्रकाली भागात गुन्हेगारीही फार मोठ्या प्रमाणात आहे.  वेश्यांची मुले हि बालगुन्हेगारी कडे लवकर वळतात हि वस्तुस्थिती दिसून येते. घाणेरडे , अपुय्रा सोयीसुविधा, व गुन्हेगारी युक्त असे अयोग्य वातावरण ह्या  भद्रकाली सफेद लेनचे आहे.

सोमवार, १४ मार्च, २०११

वेश्यांचे व्यवसायाचे प्रकार

१. स्त्रिया हा व्यवसाय वंश परंपरेने करायचा ठरवितात. तिने वंश परंपरागत चालू असलेला हा धंदा करायचा नाही ठरविले तरी समाज तिला दुसरा धंदा करून सन्मानाने जगणे अशक्य करतो.
२. कारखान्यात किवा इतर ठिकाणी नोकरी करणाय्रा स्त्रिया या नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात दुयम धंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारतात.
३.नाचणे, गाणे, तत्सम खेळ करणे व सोयीनुसार वेश्या व्यवसाय करणे हा आणखी एक वेश्या व्यवसायाचा प्रकार आहे.
४. परिस्थितीने लाचार होऊन कठीण काळातून पार पडण्यापुरता वेश्या व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या स्त्रियांचा आणखी एक वर्ग आहे, पण त्यांना धंदेवाईक वेश्या म्हणता येणार नाही.
५. अंगवस्त्र व ठेवलेली स्त्री हा वेश्या व्यवसायातील स्त्रियांचा एक प्रकार आहे.
 ६. ह्या व्यतिरिक्त देवदासी, कॉलगर्ल्स  आदि he वेश्या व्यवसायाचे आणखी काही प्रकार आहेत.
 ७. प्रकट समूहात ज्या वेश्या असतात त्या शक्यतो  परवानाधारक असतात. त्यांची शारीरिक तपासणीही नेहमी केली जाते.
८.  गुप्त समूह प्रकारामध्ये या वेश्या विनापरवाना धारक असून हा व्यवसाय लपून छपून व चोरीने करतात.











रविवार, १३ मार्च, २०११

वेश्या व्यवसायाची कारणे..............

वेश्या व्यवसाय अस्तित्वात येण्यास अनेक कारणे आहे. हा प्रश्न समाज जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असून त्या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणजे हा व्यवसाय होय. म्हणून ह्या व्यवसायाच्या मुळाशी धार्मिक, सामाजिक, आर्थिक व मानवशास्त्रीय  कारणे आहेत. डेव्हिस [समाजशास्त्रज्ञ]  यांच्या मते ह्या व्यवसायाच्या मुळाशी पुरुषांची प्रभ्त्वाची व स्त्रियांची गौणत्वाची भावना कारणीभूत असते. त्यामुळे पुरुषांच्या व स्त्रियांच्या या व्यवहाराला सामाजिक संमती मिळते.  स्त्रियांना ह्या व्यवसायाला उद्युक्त होण्यास  मुख्यता निरक्षरता, अज्ञान व दारिद्र्य हि कारणीभूत आहेत. पण त्या शिवाय काही आळशी  लोक स्वतःचा अयोग्य मार्गाने घेण्यासाठी स्त्रियांना हा व्यवसाय करण्यास भाग पडतात. 
        समाजात आर्थिक परस्थिती बिकट असेल, वेहवाहिक जीवन असंतुष्ट असेल, जर शारीरिक शोषण वा कसले दडपण असेल तर स्त्रिया ह्या मार्ग कडे वळतात. आपल्या देवाला सांड वा बोकडच वाहण्याची प्रथा असती तर त्यात देव कदाचित भक्तांच्या  दृष्टीने असंतुष्ट राहिला असता, तेव्हा देवाला संतुष्ट करण्यासाठी मुलीना देवाला वाहण्याचा प्रघात आपल्याकडे बर्याच भागात आढळून येतो, अशा स्त्रियांना देवदासी, मुरळी,वारांगना,  बसवीस,इ. नावाने संबोधले जाते.पती फार दिवस आजारी असणे,लांब असणे, पत्नीकडे पतीने दुर्लक्ष कारणे,दुर्बल असणे, इ. अनेक कारणांनी नेतिक भान नसलेल्या स्त्रिया एकाएकी ह्या मार्गाला वळतात. चांगल्या व्यक्तीशी लग्न करून सुखाचा संसार थाटण्याची त्यांची इच्छा स्वप्नवतच ठरण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे अखेरीस नाईलाजाने ते आपला परंपरागत व्यवसाय पुढे चालूच ठेवतात.
            अशा रीतीने सामान्यतः पेसा, रूढी, व परिस्थिती ह्या तीन बाबी प्रामुख्याने स्त्रियांना ह्या व्यवसायात येण्याला कारणीभूत झाल्याचे दिसून येते.

 

वेश्या व्यवसायाचा एतेहासिक आढावा

जगात  फार प्राचीन काळापासून दुर्गुणांचा व्यापार म्हणून वेश्या व्यवसायाचा निर्देश करता येईल. भारतातही हा व्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे आढळते.  भारतीय महाकाव्यात आणि पुराणिक कथेमध्ये अप्सरा ,मेनका, उर्वशी, रामभा अशा अप्सरा इंद्राच्या दरबारात देवाचे व इतर मान्यवरांचे संगीत-नृत्य गाऊन मनोरंजन करीत. आर्यान्माडे वेश्यांना अति महत्व असे. पांडव-कौरवांच्या राजवटीत हि वेश्यांना अतिशय महत्त्व होते. कोटील्ल्या अर्थाशास्त्राने वेश्याने कसे राहावे, कसे वर्तन करावे आदि विषयी नमूद केले आहे. त्यावेळी अतिशय सुशिषित वारांगणा ह्या समाजातील सुसंस्कृत व्यक्ती सोबत राहत. त्यांची सेवा हि केवळ आनंदासाठी नसून राजकारणातील डावपेच, हेराफेरीसाठी आदी कामासाठी ह्या वारांगणाचा वापरही केला जातो.
           महाकवी कालिदासांच्या कारकिर्दीत ह्या वेश्यांना मेत्रीचे स्वरूप प्राप्त झाले होते.  त्याचा संबंध ह्या मंदिराशी निगडीत होतो. ह्या वेश्या बहुतांशी तरुण होत्या तसेच त्यांचे आई-वडील  देवाच्या सेवेसाठी व धर्माचा प्रसार होण्यासाठी त्यांना अर्पण करीत. अशा वेश्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. उत्तरमध्ये - मंगलमुखी, महाराष्ट्रात- मुरळी  आदि नावाने संबोधले जाते. ह्या मुलींना समाजात आदराचे स्थान असून पूजा अर्चेच्या वेळी त्यांची उपस्थिती हि महत्वाची असते असे मानले जाते. मध्ययुगीन मुस्लीम राजवटीत हा व्यवसाय आश्रित स्वरूपाचा होता. राजातर्फे ह्या स्त्रियांना आश्रय दिला जात.  एकंदर पूर्वी ह्या वेश्यांना एक विशिष्ट स्थान होते. त्यांच्या कला कोशल्याची कदर केली जात होती. हा अशा प्रकारचा वेश्या व्यवसायाचा इतिहास आहे.

गुरुवार, १० मार्च, २०११

उमलत्या वयात वास्तवाशी चार हात!!

भारत स्वतंत्र होवून ५४ वर्षे झालीत तरी देशातील अनेक तरुणींचे स्वप्न फुलासारखे कुस्करले जात आहे. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत आजही काही गरीब आणि निरक्षर स्त्रियांसमोर पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रीचा धंदा करण्याशिवाय दुसरा रस्ता नसतो.उमलत्या वयात स्वप्नांच्या बलीवेदीवर वास्तवाशी चार हात करणार्या या स्त्रिया आता शहरातील मुख्यरस्त्यावर, प्रमुख बाजार पेठेतही फिरताना दिसू लागलेल्या आहेत. शहरातील सफेद लेन भागात हा व्यवसाय चालतो.  या स्त्रिया आठ बाय दहाच्या लहान कोंडत खोल्यांमध्ये शरीरविक्रीचा व्यवसाय चालतो. जवळपास ४० खोल्यांमध्ये हा व्यवसाय सर्रास चालतो. प्रत्येक खोलीत एक पलंग,गाधी किवा सतरंजी वापरली जाते . बाजूला निरोध टाकण्यासाठी जागा पण असते.वापरलेले निरोध उघड्यावर पडलेले असल्यामुळे रोगराई पसरण्यास मदत होते. अशा या घाणेरड्या वातावरणात ह्या स्त्रियांची मुले वाढत असतात. साहजिकच या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर पण होतो. अनेक वेळेस परपुरुषांबरोबर आपल्या आईच्या संबंधाचे दर्शनही त्यांना उघड्या डोळ्यांनी पहावे लागते  यातूनच त्यांची गुन्हेगारी वृत्ती बळावते.
                      

कुकर्म त्यांना जगवत हीच शोकांतिका


जी हा हम वेशाये जरूर हे!  लेकीन इस धंदे पे तो हमारी रोजीरोटी  चलती हे!  सरकार हमे सादा कंडोम बोक्स  नही  दे सकती ओर वो पुनर्वसन कि बात करते हे! क्या समाज हमे स्वीकार करेगा? क्या हमारी बहु बेटिया हमसे बात करेगी? क्या हमारे बच्चो के साथ आप के समाज के लोग शादी करेंगे? असे अनेक प्रश्न सफेद्लेन मधील देहविक्री  करणार्या स्त्रिया करीत आहेत. त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्या जीवनाशी निगडीत व्यथा आणि आडचणी  आगदी दिलखुलासपणे  मांडल्या .
  आम्हाला रोजीरोटी  मिळवून देवू असे लोक सांगतात  पण साधे निरोध देत नाहीत तर रोजीरोटी  कुठून देणार? सरकारने रोजीरोटी जरी दिली तरी हे लोक आम्हाला त्यांच्यात सामावून घेतील का? असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.नाशिक शहरात भद्रकाली, विनय नगर, गंजमाळ असे सफेद लेन  भाग आहेत. या परिसरात नेपाळी स्त्रिया मोठ्या प्रमाणात देहविक्री करताना आढळून येतात. गरिबीमुळे अनेक मुली या मार्गाला लागतात. असंख्य स्त्रियांना  तसेच मुलीना त्यांचे भाऊ, वडील किंवा नवरेच विकतात. याच व्यवसायात केवळ स्त्री असल्याच्या बळावर जास्तीतजास्त  पैसा कमवण्याची शक्यता असल्याने काहीना या  व्यवसायाची भुरळ पडते.नवीन येणारी स्त्री सहजासहजी शरीर विक्रीला तयार नसते. अशावेळी कुंटणखाण्याची  मालकीण व तिचे साथीदार धमक्या देवून,मारहाण करून बळजबरीने तिला धंदा करायला भाग पाडतात. अनेकदा  तर गुंडांकरवी बलात्काराचा मार्ग अवलंबिला जातो. यानंतर येणारा प्रत्येक पुरुष तिचा हवा तसा उपभोग घेवून शोषण करतो. दिवसातून किती जणांना संमती द्यावी याचे तिला स्वातंत्र्य नसते. यातून प्राप्त होणारा फार थोडा भाग तिच्या हाती पडतो.
         समाजाने नाकारलेल्या, समाजाकडून  हिणवलेल्या,स्वप्नांचा चुराडा झालेल्या या देहविक्री करणार्या स्त्रियांची जबाबदारी नाशिक मधील एकही सामाजिक संस्था स्वीकारण्यास तयार नाहीये हि दुर्देवाची गोष्ट! त्यामुळे या स्त्रियांना गरजेचं कुकर्म करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.......